सुदानमध्ये अराजकता / जारी केल्या भारतीय दूतावासाने मार्गदर्शक सूचना
New Delhi: खार्तुम ही सुदानची राजधानी येथे सुदानचे सैन्य आणि निम-लष्करी दले यांच्यामधील संघर्ष सोमवारी तिसऱ्या दिवशीही तसाच चालू आहे. मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

या हिंसाचारात सामान्य जनतेचा ही बळी जात असून, या संघर्षात आत्तापर्यंत मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या १८० इतकी झाली आहे. तसेच जखमींचा आकडाही वाढत आहे. अनेक सैनिकांचे मृतदेह पडल्याचे दिसून येत आहे. लूटमारीच्या अनेक घटना खार्तुम मधून समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय दुतावासाने सर्व, नागरिकांना घराबाहेर कृपया पडू नये, आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचा साठा करून ठेवावा, कारण ही स्थिती अजून काही दिवस असेच राहू शकते. घरीच राहा आणि सुरक्षित रहा. हे अडव्हाझरी भारतीयांना जारी केली आहे.
सुदानमध्ये भारतीय नागरिकांची संख्या साधारणपणे ४००० आहे. त्यापैकी १२०० नागरिक अनेक वर्षांपूर्वी तेथे स्थायिक झाले आहेत. तेथे चालू असलेल्या संघर्षात रविवारी केरळमधील रहिवासी असलेला एका व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सर्व ती मदत केली जाईल असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
सुदानमध्ये काय नेमकं घडले?
उत्तर अफ्रिका खंडातील सुदान हा सर्वात मोठा अरब देश आहे. या देशाची राजधानी खार्तुम इथं गेल्या तीन दिवसांपासून लष्कर आणि निलष्करी दलाच्या जवानांमध्ये झटापट आणि तुफान गोळीबाराच्या घटना सुरु आहेत. यामध्ये आत्तापर्यंत १८० लोकांचा मृत्यू झाला आहे.